Vishal Borkar (Journalist)
View Point News
नागपुर:-
-भारतीय संविधान व लोकशाही जगात सर्वोत्कृष्ट म्हणून गणली जायची. परंतु सन 2014 पासुन भारत देशात ईव्हीएम चा दुरुपयोग वाढल्यामुळे भारतीय लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. लोकांनी दिलेल्या प्रत्यक्ष मतदानात गडबडी करुन निवडतुकीचा निकाल बदलविण्यात येत आहे. मतदारांने दिलेले अमुल्य मत नेमके आपल्याच पसंतीच्या उमेदवाराला गेले की नाही हे जाणुन घ्यायचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार आहे. परंतु सध्या 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप नेत्यांनी ईव्हीएम मध्ये इजराइल टेक्नालॉजी चा वापर करून मतदानाची टक्केवारी वाढवली आणि भाजप महायुतीचे अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आणले. त्यामुळे मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा हा अपमान आहे. त्याविरोधात संपुर्ण देशात निवडतुक आयोगाच्या कार्यप्रणाली वर जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. उद्या दि. 1 डिसेंबर 2024 रोजी महादुला कोराडी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन ” ईव्हीएम हटाव, देश बचाव” मोहिमेअंतर्गत कांग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या नेतृत्वाखाली नागपुरच्या संविधान चौकात भव्य बाईक रैली चे आयोजन सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. नागपुरच्या संविधान चौकात ईव्हीएम हटाओ देश बचाओ चे आंदोलन सभा असुन या आंदोलनात कांग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुनील केदार, खासदार शामकुममार बर्वे, आ.संजय मेश्राम, आ. अभिजीत वंजारीं, नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे, व अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती कांग्रेसचे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी दिली आहे. उद्या आयोजित भव्य बाईक रैलीत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहुन लोकशाही व संविधानाचे रक्षण करावे असे आवाहन रत्नदीप रंगारी यांनी केले आहे.
